Tuesday 29 July 2014

Kasa Jagava

Kasa Jagava


निर्णय चुकतात
आयुष्यातले
आणि
आयुष्य चुकत जाते..


प्रश्न कधी कधी
कळत नाहीत
आणि
उत्तर चुकत जाते..



सोडवताना वाटतं
सुटत गेला गुंता..
पण
प्रत्येक वेळी
नवनवीन गाठ
बनत जाते!

दाखविणाऱ्याला
वाट माहित नसते..
चालणाऱ्याचे ध्येय
मात्र हरवून जाते...!


दिसतात तितक्या
सोप्या नसतात
काही गोष्टी..
"अनुभव"
म्हणजे काय हे
तेव्हाच कळते...



असे मित्र बनवा
जे कधीच
साथ सोडणार नाही..
असे प्रेम करा
ज्यात
स्वार्थ असणार नाही..

असे हृद्य बनवा
कि ज्याला
तडा जाणार नाही..
असे हास्य बनवा
ज्यात
'रहस्य' असणार नाही..

असा स्पर्श करा
ज्याने
जखम होणार नाही..
असे नाते बनवा
ज्याला
कधीच मरण नाही..

आयुष्य थोडसच असावं
पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं

आयुष्य थोडंच जगावं
पण जन्मोजन्मीचं प्रेम मिळावं

प्रेम असं द्यावं
की घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी,


मैत्री अशी असावी
की स्वार्थाचं भानं नसावं,


आयुष्य असं जगावं
की...


मृत्यूनेही म्हणावं,
"जग अजून, मी येईन नंतर....!!!!

No comments:

Post a Comment